http://shrwandeore.blogspot.in/

Monday, February 4, 2019

56 BahujanNama Tharar End 20 Jan 19 Daily Laokmanthan


छपन्नावी खेप ......!     ( दै. लोकमंथन, रविवार,  20 जानेवारी 2019 च्या अंकासाठी)
 बहुजननामा-56
     तो 15 दिवसांचा थरार....! (भाग-अंतिम)
बहुजनांनो.... !   
15 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर दरम्यानच्या या 15 दिवसांची ही थरार-हकीकत गेल्या काही दिवसांपासून मी आपल्यासमोर चार भागात मांडली. अजून काही बरेचसे लिहायचे होते. काही मुद्दे सुटून गेलेत, काही मुद्दे जाणीवपूर्वक टाळलेत. हकीकत सांगतांना कोणाची मुद्दाम स्तुती करणे किंवा कोणाची तरी जाणिवपुर्वक बदनामी करणे, तुमची ईच्छा असली तरी, तुम्ही ते करू शकत नाहीत. कारण घडलेल्या घटना घडत असतांनाच हे हकीकत-कथन चालू होते. त्यामुळे कोणी कोणाकडे पुरावे मांगत बसण्याची गरज नाही. कारण दर्शन, श्रवण, कथन, लेखन व वाचन या सर्व क्रिया एकाच वेळी घडत होत्या. त्यातही मी कमीत कमी कटूता येईल याची काळजी घेत होतो.
लढाईत एखादी व्यक्ती जेव्हा एकाकी पडते, तेव्हा ती सर्वप्रथम चिडते ते आपल्याच रक्ता-मांसाच्या भरवशाच्या माणसांवर! त्यांनी उठावे, सोबत यावे, किमान लांबून का होईना, ‘लढ’ म्हणून प्रोत्साहन द्यावे, अशी अपेक्षा असते. तेही जर मान्यवरांकडून होत नसेल तर, कोणत्याही लढणार्‍या माणसाचा ‘तोल’ जाणं स्वाभविक आहे. त्यातून निश्चितच माझ्या कडून काही व्यक्ती दुखावल्या गेल्या आहेत, त्यांची मी ‘बिनशर्तपणे’ जाहीर माफी मागत आहे. ते मला मोठ्या मनाने माफ करतील, याचीही मला खात्री आहे.
जुने मित्र नाही आलेत. परंतू या लढ्यात मला काही नवे मित्र भेटलेत. राजकारणी लोकांपासून नेहमीच अंतर ठेवून वागणारा मी एक कार्यकर्ता! पण प्रथमच माननीय प्रकाश आण्णा शेंडगे यांच्या जवळ आलो आणी मी त्यांचा फॅन झालो. हा माणूस मला कोणत्याच अंगाने राजकारणी वाटला नाही. पूर्णपणे समाजकारणी! या माणसात कमालीचा नम्रपणा ठासून भरलेला आहे. गाडी फुल्ल झाल्यावर एक कार्यकर्ता गाडीबाहेरच राहीला. आण्णा स्वतःच्याच गाडीतून खाली उतरतात व बाहेर राहीलेल्या कार्यकर्त्याला आपल्या पहिल्या शीटवर बसण्याचा आग्रह करतात. डॉ. दिलीप घावडेंनी हा अनुभव घेतला आणी त्यांना तर गहीवरूनच आले. आणखीन एक प्रसंग... दिवसभराच्या धावपळीत माझं रात्रीचं जेवणच राहून गेले, असे जेव्हा आण्णांना कळले, तेव्हा आण्णा रात्री 12 वाजता आमदार निवासात आले व मला जेवणसाठी बाहेर नेले. माणूस भोळाच! मात्र अशा भोळ्या माणसाचा काही धुर्त लोक गैरफायदा घेतात, हेही मी प्रत्यक्ष पाहिले. या लढ्यात प्रकाश आण्णा शेवटपर्यंत साथ-साथ राहीलेत. आमदार नसतांनाही ते त्यांचे विधानभवनात दादागीरीने घुसणे, विधानभवनातील राष्ट्रवादी पक्षाच्या दालनात दरवाज्याला धडक मारून आत शिरणे, पुण्याच्या ओबीसी परिषदेत सर्वच राजकीय पक्षांवर तोफ डागणे, असे बरेच काही प्रसंग आठवले की, आण्णांचे मोठेपण जाणवते. असाच बेधडकपणा आण्णांनी राजकारणात दाखविला असता तर, आतातपर्यंत कितीतरी वेळा मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीवर आण्णाच दिसले असते.
दुसरे एक मित्र जे बारक्या जात-संघटनेचे नेतृत्व करीत ‘ओबीसी नेते’ म्हणून मान्यता
पावलेले, बालाजी शिंदे! ओबीसींमधील एक धडाडती तोफ! जात-दांडगे व धन-दांडग्या सत्ताधार्‍यांना भाषणातून कसं धुवून काढायचं, हे तर बालाजींकडूनच शिकायला पाहिजे. सतत प्रवासात, पायाला भिंगरी लावून फिरणारा हा निर्भीड माणूस! एका रात्रीतून नांदेडहून पुणे व पुण्यातून मुंबई गाठणारा हा माणूस मिटींग झाल्यावर लगेच निघणार नाशिक-धूळे दौर्‍यावर! अतिशय उर्जा असलेला नेता! परीट-धोबी समाजाला आपण अतिअल्पसंख्य म्हणून बारकी जात म्हणतो. पण या जातीतही ‘ओबीसी’ चळवळीचे जे स्फुल्लींग या माणसाने चेतवलेले आहे, ते अजून ‘’माळ्या-तेल्यांच्या नेत्यांनाही’’ जमलेले नाही. एक ‘ईगो’ व दुसरा ‘बेरकीपणा’ या दोन गोष्टी जर विर्सजित झाल्यात तर, हा माणूस निश्चितच महाराष्ट्रातील ओबीसींना सत्तापदावर नेल्याशिवाय राहणार नाही.
अरूणराव खरमाटे हे एक आगळे-वेगळे व्यक्तीमत्व आहे. अत्यंत शांत, मृदूवाणी व संयमित वागणे. आपला मुद्दा मांडतांना वा पटवून देतांना कोठेही आक्रस्ताळेपणा दिसणार नाही. रस्ता चुकलेल्या नव्या कार्यकर्त्याला समजावून सांगण्यात यांचा हातखंडा! छोट्याशा ओबीसी जमातीतून आलेले खरमाटे हे ‘ओबीसी नेते’ म्हणून जिल्हापरिषदेपर्यंत पोहोचले. या लढ्यात जर ते शेवटपर्यंत टिकून राहीलेत तर निश्चितच ते ओबीसी चळवळीचे शिल्पकार ठरतील, यात मला शंका वाटत नाही.
या लढ्यात एक तडफदार उमदा तरूण अचानक संपर्कात आला व सतत माझ्यासोबत माझा बॉडीगार्ड सारखा राहू लागला. कोल्हापूरचा सचिनदादा माळी हा पूर्वी राजूशेट्टींच्या संघटनेत आक्रमक कार्यकर्ता म्हणून प्रसिद्ध होता. मध्यंतरी काही मतभेद झाल्यावर तो शेट्टींपासून दुरावला. लहानपणापासूनच व्यायामाची आवड असलेला हा तरूण आपल्या पीळदार व कसदार शरीराने समोरच्या माणसात धडकीच भरवतो. त्याने अनेक कुस्त्यांचे फड गाजवलेले आहेत. परंतू जसे त्याचे शरीर व्यायामाने कसदार बनले आहे, त्याचप्रमाणे त्याची बौद्धिक क्षमताही परिपूर्ण आहे. त्याने गेल्या एक वर्षात माझी अनेक पुस्तके वाचली व तो माझा मित्रच बनला. जेव्हा त्याला टि.व्ही. चॅनल्सवरून समजले की, श्रावण देवरे मैदानात उतरले आहेत, तेव्हा तो त्वरीत मुंबईत आला व पहिल्या दिवसापासून माझ्यासोबत राहतो आहे. फुले आंबेडकर विद्यापीठाचा ‘संविधान गौरव परीक्षेचा’ कार्यक्रमही तो आता कोल्हापूर जिल्ह्यात राबवीत आहे.
     या सर्वात धाडसी ठरलेत ते आमदार हरिभाऊ राठोड! जे विद्यमान आमदार, खासदार असतात, ते सहसा मतांच्या राजकारणाच्या दबावाखाली मराठासारख्या डॉमिनन्ट वोटबँकेच्या विरोधात जात नाहीत. पण हरिभाऊ विद्यमान आमदार असतांनाही व भावी खासदार म्हणून निवडून यायचे असतांनाही त्यांनी ठामपणे मराठा ओबीसीकरणाच्या आरक्षणाला विरोध केला. अर्थात या सर्व लढ्यात ते आमच्या सोबत ओबीसी जनगणना अभियानापासूनच आहेत. सुरूवातीला हरिभाऊ बंजारा समाजाच्या पलिकडे जात नव्हते. ओबीसींचे चार तुकडे करणार्‍या रोहिणी आयोगाच्यापुढे त्यांची मजल जात नव्हती. मात्र आमच्यासोबत राहून ते हे सर्व विसरले व फक्त ‘‘ओबीसी...ओबीसी’’ जपमाळ करू लागलेत. मराठा ओबीसीकरणाच्या आरक्षणाला त्यांनी जो विरोध केला, तशी हिम्मत आज एकही विद्यमान आमदार करू शकलेला नाही, करूही शकत नाही. त्यांच्या आमदार निवासातली 612 नंबरची रूम ही या 15 दिवसांच्या थरार युद्धातील वॉर रुम होती. आजही आहे. कॉंग्रेस पक्ष मराठा आरक्षणाला उघड समर्थन करीत असतांनाही हरिभाऊ वेगळी भुमिका घेतात व आपल्याच पक्षातील जात-दांडग्यांना आव्हान देतात, यासाठी ‘’मर्दानगीची’’ गरज असते. ढाण्या वाघ म्हणून मिरविणारे अनेक ओबीसी नेते पायलीचे पंधरा मिळतील! पण याच षंढ ढाण्या वाघांना जेव्हा उंदरांच्या बीळात जाऊन लपून राहावे लागते, तेव्हा आमचे जहांमर्द प्रकाश आण्णा, हरिभाऊ, बालाजी व खरमाटे हे कोणताही आव न आणता खरेखुरे ‘‘जहांमर्द ओबीसी नेते’’ ठरतात, हे या 15 दिवसांच्या थरार लढ्यात सिद्ध झाले.
एक फार मोठे नाव, अशोकराव सोनवणे जे गेल्या 20 वर्षांपासून अखंडपणे 16 पानी दैनिक चालवीत आहेत, ‘दैनिक लोकमंथन’!... यांचा निर्भीडपणा कोणत्याही ‘खर्‍या’ सिंहापेक्षा कमी नाही. ओबीसींचा मोठाभाऊ म्हणविणार्‍या ‘‘गांडू’’ माळ्यांना जे कधीच जमले नाही व जमणारही नाही,  ते या ‘मर्द’ कुंभाराने करून दाखविले व करून दाखवीत आहे. ‘‘गांडू माळ्यांना’’ आधुनिक जाणत्या राजाच्या बुटांना चाटण्याची सवय लागलेली आहे. अशोकराव सोनवणे हा कुंभार समाजातील अत्यंत अल्पसंख्यांक बारक्या जातीतील मर्द माणूस हाच खरा ‘‘ओबीसी नेता’’ आहे. मी पाठविलेले सर्व बहुजननामे शिवीगाळसह बिनधास्तपणे छापतो व वरून चॅलेंजही देतो. अशोकरावसारखा मर्द माणूस जन्माला यायला एक पीढी खपावी लागते.
या 15 दिवसात आधीच ओबीसी नेते म्हणून सिद्ध झालेले राजाराम पाटील, चंद्रकांत बावकर, मृणाल ढोले पाटील, मंगेश ससाणे, ऍड. आंधळे व त्यांच्या साथीदारांनी चांगलीच लढत दिली. या शिवाय प्रतापराव गुरव, प्रा. टि.पी. मुंडे, माजी आमदार डॉ. नारायणराव मुंडे, ऍड. संजय भाटे, संजय राठोड, डॉ. ज्ञानेश्वर गोरे, विलासराव काळे, शंकरराव आण्णा लिंगे, सचिन माळी, प्रा. करघणे, दिगंबरराव लोहार, पी.बी. कुंभार आणी आणखीन बरीच जहांमर्द नावे....सॅल्यूट फॉर ऑल.... दिलसे....
या अचानक आलेल्या मराठा संकटाच्या वावटळीने (भूतभवरीने) बरेच काही उडवून नेले. माझे नोव्हेंबर-डिसेंबर मधील पूर्वनियोजित व्याख्यानांचे, मिटींग, मेळाव्यांचे कार्यक्रम मला अचानक रद्द करावे लागलेत. बर्‍याच संयोजकांनी पूर्वनियोजित कार्यक्रमांवर परिश्रम व पैसा खर्च केला होता, ते माझ्यावर जाम नाराज झालेत. मी त्यांच्यासमोर ओबीसी आरक्षणाच्या ‘‘ जीवन-मरणाचा’’ प्रश्न उभा केला. तेव्हा त्यांनी स्वतःच मला परवानगी दिली व सांगीतले की, ‘‘सर, तुम्ही आमच्या कार्यक्रमाला येऊ नका... आपण ओबीसींचे आरक्षण वाचवण्याला प्राधान्य द्या!’’ यात सर्वात मोठे नुकसान झाले ते ‘फुले आंबेडकर विद्यापीठाच्या राज्यस्तरीय संविधान गौरव परीक्षेचे’! ते नुकसान मी येथे शब्दात व्यक्त करू शकत नाही.
15 नोव्हेंबरपासून सुरू झालेला हा थरार 29 नोव्हेंबरला एक पर्व पूर्ण करून दुसर्‍या पर्वात आला आहे. या दुसर्‍या पर्वात माननीय ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मराठा गुंडांनी केलेला शारिरिक हल्ला झाला. अनेक विरोधी वकीलांना व कार्यकर्त्यांना धमक्या आल्यात. न्यायमुर्ती गायकवाड आयोगाच्या ‘बोगस’ गठणाला व त्यांच्या बोगस अहवालाला ‘जहांमर्द आमदार ईम्तियाज जलील व त्यांचे महामर्द वकील ऍड. तळेकर साहेबांनी दिलेले आव्हान फार महत्वाचे ठरले. मराठा जातीयवादी असलेल्या न्यायाधिश(?) गायकवाडांचा बोगस मराठावादी-अहवाल कोर्टातही सादर न करण्याची सरकारची भुमिका, ओबीसी आरक्षणाला व मुळ ओबीसींच्या यादीलाच आव्हान देणारीर्‍ सराटेंची याचिका, या बोगस याचिकेला पाठींबा देणारा महाराष्ट्र शासनाचा बदमाश सरकारी वकील, वकीलांची फौज उभी करून न्यायधिशांवर दहशत माजविणारे मराठा लोक आदि अनेक घटना घडत होत्या व घडत आहेत. यात सर्वात मोठी घटना घडली ती केंद्र शासन पुरस्कृत ‘‘10 टक्के उच्चजातीय आर्थिक आरक्षणाची!’’ तीचेही विश्लेषण नंतर करू या.. हा सिलसिला 2019-20 च्या निवडणूकांपर्यंत दमदारपणे चालणार आहे! त्याचाही आढावा पुढील बहुजननामात घेऊ या, तो पर्यंत जयजोती जयभीम! सत्य की जय हो....!!
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग- https://shrwandeore.blogspot.in/
ईमेल- s.deore2012@gmail.com

1)  महानायक... मध्ये प्रसिद्ध 22 जानेवारी19
2) दैनिक लोकमंथन 20 जानेवारी19 रविवार
3) ई-पेपर.... http://www.readwhere.com/read/1988233#page/5/2

No comments:

Post a Comment