http://shrwandeore.blogspot.in/

Saturday, February 23, 2019

59 BahujanNama OBC morcha Daily Lokmanthan 23Feb19


बहुजननामा-59    
मुलगी रंडकी होऊ द्यायची नसेल तर, या! आझाद मैदानावर 25 फेब्रुवारीला!
ओबीसींनो..... !   
भारतात कोणत्याही समाजघटकाला संघटित करणे सोपे आहे. नीळा झेंडा लावला की 5 मिनिटात हजार-पाचशे दलित गोळा होतात. मजहब खतरे मे अशी आरोळी ठोकताच 2-4 हजार मुस्लीम सहज गोळा होतात. परंतू सर्वात कठीण काम आहे ते ओबीसी एकत्र येण्याचे! आमचं अख्ख आयुष्यच या कामात व्यतीत होत आहे. माझ्या सारखे व माझ्याहीपेक्षा जास्त काम करणारे ओबीसी कार्यकर्ते महाराष्ट्रातच काय देशातही खूप आहेत.
मंडल आयोग लागू होईपर्यंत ओबीसी जातीत जन्मलेला एकही नेता स्वतःला ‘‘ओबीसी’’ म्हणवून घ्यायला धजत नव्हता. असंख्य लहान-मोठ्या ओबीसी कार्यकर्त्यांच्या परीश्रमाने चळवळ उभी राहीली, त्याच्या परीणामी 1990 ला व्हि.पी. सिंगांनी मंडल कमिशनची पहिली शिफारस लागू केली. त्यामुळे ओबीसींमध्ये जागृती गतिमान झाली. त्यानंतर ‘‘ओबीसी नेत्यांचे’’ अमाप पीक आले. या अमाप ओबीसी नेत्यांनी अशी काही कामगिरी केली की, आज ओबीसी आरक्षण नष्ट होण्याच्या कड्यावर उभे आहे.
हे आरक्षण वाचविण्यासाठी आम्ही काही मुठभर ओबीसी कार्यकर्त्यांनी 15 नोव्हेंबरपासून संघर्ष सुरू केला. त्याचा पहिला टप्पा 25 फेब्रुवारी 2019 रोजी आझाद मैदानावर संपणार आहे. या पहिल्या टप्प्यात मित्रशक्ती व शत्रूशक्तीचे अनेक अनुभव आलेत. त्यापैकी काही अनुभव मी बहुजननामात या आधीच लिहीले आहेत.
कोणताही समाजघटक जो पर्यंत स्वाभिमानी व स्वच्छ नेता घडवित नाही, तो पर्यंत तो समाज प्रगती करू शकत नाही. 1992 नंतर ओबीसीला ‘ओबीसी’ म्हणून संघटित करण्याचे काम ज्या राजकिय ओबीसी नेत्यांनी केले, त्या सर्वांचे मालक एकतर मराठा आहेत किंवा ब्राह्मण आहेत. त्यामुळे प्रामाणिक ओबीसी कार्यकर्त्यांनी संघर्ष करून 1992 ला जे मिळविले होते, ते हळू हळू कमी होत, आज ते संपून नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. आज ओबीसी वोटबँक राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. त्यामुळे ओबीसींचे लचके तोडून राजकीय फायदा लाटण्याचे काम सर्वच राजकीय पक्ष करीत आहेत. तेली, माळी, धनगर अशा ओबीसी जातीत जन्मलेल्या व्यक्तींना आमदारकी खासदारकीची तिकीटे देऊन ते ओबीसींचे हितचिंतक बनू पाहात आहेत. पण आपण गेल्या 4 वर्षात अनुभव घेतला. ओबीसी माणूस प्रधानमंत्री झाला तरी तो ओबीसींचे भले करू शकत नाही, कारण त्याचा मालक ब्राह्मण असल्याने त्याने ओबीसींचे नुकसानच केले. परंतू, जर ओबीसी हा ‘ओबीसी’ म्हणून स्वतंत्रपणे राजकारणात उतरला तर या 52 टक्क्यांच्या पुढे या 2-4 टक्के ब्राह्मण-क्षत्रिय जातींचे राष्ट्रीय (?) पक्ष कुठल्याकुठे उडून जातील. आपण आपल्याच ओबीसी दमावर मुख्यमंत्री-प्रधानमंत्री बनवू शकतो. म्हणूनच ओबीसीला ‘ओबीसी’ म्हणून संघटित होऊ द्यायला त्यांचा विरोध आहे.
15 नोव्हेंबर पासून आम्ही केलेल्या संघर्षाचे फलित हेच आहे की, आजचे मरण पुढे ढकलले गेले आहे. हे आरक्षण वाचवायचे असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. 25 फेब्रुवारी रोजी तुम्ही किती जागृती दर्शवता त्यावर अवलंबून आहे. ओबीसी व्यक्ती ज्या प्राथमिकतेने लग्नाला, मौतीला जातो, त्याच प्राथमिकतेने तो 25 फेब्रुवारीला आझाद मैदानावर आला पाहिजे. मित्राच्या, नातेवाइकाच्या लग्नाला गेलो नाही तर तो मित्र वा नातेवाईक नाराज होतो व तो आयुष्यभर आपल्याला शिव्या देतो. या भीतीपोटी आपण आपल्या मित्राच्या लग्नाला रजा टाकून जातो, सर्व महत्वाची कामे बाजूला सारून लग्नाला हजर राहतो. परंतू ओबीसी कार्यक्रमाला जर गेलो नाहीत पुढच्या अनेक पीढ्या आपण नरकात ढकलणार आहोत. आधीच ओबीसी बलुतेदार जातींचे पारंपारिक व्यवसाय बुडालेले आहेत. एकमात्र आरक्षणाचा आधार आहे, की ज्यामुळे आपला मुलगा-मुलगी कुठेतरी कारकून-शिपाई म्हणून नोकरीला लागू शकतो. आता हा आरक्षणाचा आधारही मराठा-जाटसारख्या क्षत्रीय जातींच्या खिशात गेला तर, तुमच्या पुढच्या पिढ्या वेठबिगार झाल्याशिवाय राहणार नाहीत. लग्नाला गेलो नाही म्हणून मित्र कोपला, तर तो एकटाच शिव्या देतो, मात्र ओबीसी कार्यक्रमाला गेलो नाही, तर पुढच्या पिढ्यातील लाखो मुलं तुम्हाला पीढी-दर-पीढी शिव्या देत राहतील
आज कोणत्याही माणसाला विचारा, तुम्हाला आपल्या मुलीसाठी जावई कसा पाहिजे? तर तो लगेच उत्तर देतो- ‘‘नोकरीवालाच पाहिजे.’’ पण ओबीसी आरक्षण खतम झाले तर नोकरीवाला जावई कसा मिळेल? नाईलाजास्तव तुम्हाला तुमची मुलगी शेतकर्‍यालाच द्यावी लागेल. आणी हा शेतकरी जावई लग्नानंतर दोन वर्षाच्या आतच आत्महत्त्या करतो. म्हणजे तुमची मुलगी लग्नानंतर लगेच ‘‘रंडकी’’ बनून तुमच्या घरी परत येईल. तेव्हा ती मुलगी कोणाला दोष देईल? अर्थातच तुम्हाला! पुढच्या पीढीच्या शिव्या खायच्या नसतील तर 25 फेब्रुवारीला आझाद मैदानवर या! न चूकता 11 वाजेपर्यंतया!  कोणतीही सबब सांगू नका.
आपण मोठ्या संख्येने याल या अपेक्षेसह जयजोती, जयभीम .... सत्य की जय हो!!
------- प्रा. श्रावण देवरे
           Whatsap No. Mobile – 88 301 27 270
            Blog ब्लॉग- https://shrwandeore.blogspot.in/
ईमेल- s.deore2012@gmail.com

No comments:

Post a Comment