बहुजननामा-120
पिडिताच्या खूनाचा निषेध व माळी समाजाचे अभिनंदनीय वर्तन!
-1-
महाराष्ट्रातील जालना जिल्याह्यातील मंठा येथे
माळी समाजाच्या नवविवाहितेचा एकतर्फी प्रेम प्रकरणातून खून झालेला आहे. त्याचा
जाहीर निषेध करून संबंधित गुन्हेगारास कायद्यानुसार योग्य ती कडक शिक्षा झाली पाहिजे व
त्यासाठी त्या परिसरातील पुरोगामी नागरिकांनी संयुक्तपणे प्रयत्न केला पाहिजे. याबाबत
संयम ठेवून माळी समाजाने जे काम
परंतू तरीही पुढील गोष्टींकडे डोळ्यात तेल घालून
लक्ष द्या.......
1)
RSS-संघाने प्रत्येक जातीतील निवडक तरूणांना
प्रशिक्षीत करून त्यांना त्यांच्या जातीत काम करण्यासाठी सोडून दिलेले आहे. माळी जातीतही असे संघ-प्रशिक्षित तरूण असू शकतात.
हे तरूण आपापल्या जातीत खोटा जात्याभिमान निर्माण करतात तसेच जाणीव पूर्वक
चूकीच्या व खोट्या अफवा पसरवून लोकांना भडकवीतात.
2)
RSS-संघाने पढविलेले माळी-तरूण पिडीत तरूणीच्या
घरासमोर रोज जातीचे मेळावे घेण्याचा प्रयत्न करतील, असा प्रयत्न हाणून पाडा.
3)
जातीचे
मेळावे पिडीत तरूणीच्या घरासमोर झालेत तर हे भटाळलेले माळी तरूण भडकावू भाषणे
करतील व धार्मिक-जातीय तेढ निर्माण करतील. अशा मेळाव्यांना ब्राह्मणी मिडीया भरपूर
प्रसिद्धी देतो. त्यामुळे वेगवेगळ्या पक्षांचे पुढारी तुमच्या मेळाव्याला भेटी
द्यायला येतील व तुमचा जातीय उन्माद वाढवतील.
4)
अशा
जात-उन्मादाच्या मेळाव्यात हे संघ-प्रशिक्षित माळी लोक जाणीवपूर्वक चूकीची
आकडेवारी देतील व समाजाला चिथविण्याचा प्रयत्न करतील. उदाहरणार्थः- ‘‘आमच्या माळी
पोराला 96 टक्के मार्क्स मिळूनही अकरावीला प्रवेश मिळत नाही व दलितांच्या मुलांना
36 टक्के मिळाले तरी त्यांना प्रवेश मिळतो’’, असे कुभांड ते रचतील, त्यांना तेथेच
ठेचून काढा.
5)
आणखी
एक नवटंकी ते उभे करतील- माळी जातीच्या पाचवी शिकत असलेल्या पोरीला ते भाषण लिहून
देतील व तीच्या कडून ते भाषण पाठ करवून घेतील. तीला माळी समाजाच्या मोर्च्यासमोर
उभे करून हे पाठांतर केलेले भाषण बोलायला लावतील. या भाषणातून आरक्षण कसे वाईट
आहे व त्यातून गुणवत्ता कशी बिघडते, आरक्षणामुळे दलित कसे माजलेत, मुस्लीम कसे
माजलेत वगैरे असे उच्च कोटीचे तत्वज्ञान ती मुलगी आपल्या जातीला पाजळेल. अशा
पोरीला व तीच्या भाषणाला ब्राह्मणी टिव्ही मिडिया भरपुर प्रसिद्धी देतात, असा
प्रत्यक्ष अनुभव आपण सर्वांनी दिड-दोन वर्षांपूर्वी घेतला आहे. अशी नवटंकी
हाणून पाडा.
6)
अशा
मेळाव्यातून वा बैठकीतून माळी समाजातील पुरोगामी लोकांना व सच्च्या मार्गदर्शक
विचारवंतांना समाजापासून तोडण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. त्यांना अपमानास्पदरित्या
बैठकीतून हाकलून दिले जाऊ शकते. महाराष्ट्रातील दोन ऋषीतूल्य माजी न्यायधिशांचा
अपमान त्यांच्याच जातीने कसा केला, हे महाराष्ट्राने नुकतेच उघड्या डोळ्याने
पाहिलेले आहे. वैदिक ब्राह्मणांनी निर्माण केलेला असा जात-उन्माद माळी समाजाला
परवडणारा नाही.
7)
‘‘माननीय
रामदास आठवले, बाळासाहेब प्रकाश आंबेडकर’’ यासारख्या दलित नेत्यांनी किंवा मुसलमान
नेत्यांनी पिडित मुलीच्या घरी भेट द्यायला येवु नये’’, असा जातीयवादी फतवा काही
संघी-माळी काढण्याची शक्यता आहे, अशा संघीस्ट माळ्याला जागेवरच ठेचून काढा. अर्थात
अजून एकाही माळ्याने असा फतवा काढला नाही व काढणारही नाही, कारण माळीसमाज
बाबासाहेबांचे गुरू असलेल्या तात्यासाहेबांच्या रक्ताचेही वारसदार आहेत व
विचारांचेही वारसदार आहेत. माळी समाज वैदिक-ब्राह्मणांचे घाणेरडे रक्त आपल्या माळी
समाजात मिसळू देणार नाहीत, या बद्दल मला खात्री आहे.
8)
तुमच्यात
माळी-उन्माद निर्माण व्हावा म्हणून संघ-भाजपावाले तुम्हाला चूकीची आश्वासने देऊ
शकतात. उदाहरणार्थ- संघ-भाजपावाले सांगतील की, ‘‘पिडीत मुलीला न्याय देण्यासाठी
माळी समाजाला दलित-कॅटेगिरीचे आरक्षण दिले पाहिजे, जेणेकरून माळ्यांना दलितांचे
ताट हिसकावता येईल व माळ्यांचा प्रचंड वेगाने विकास होईल.’’ संघ-भाजापाचा
उद्देश तुम्हाला आरक्षण देण्याचा नसतो तर, दलित-माळी, मराठा-ओबीसी यांच्यात भांडणे
लावणे, हा खरा उद्देश असतो.
9)
संघ-भाजपाचा
हा डाव यशस्वी करण्यासाठी दलितांमधील सर्वात जास्त बुद्धीमान असलेली एक संघटना
माळी समाजाला भेटायला येईल. ‘‘माली समाज को दलित आरक्षण मिल गया तो सब माली
बुद्धीस्ट हो जाएंगे और देशमे क्रांती लाएंगे’’ अशा विषयांवर हे दलित बुद्धीमान
परिषदा भरवतील व तुम्हाला
‘मिस-गाईड’ करतील.
10) माळ्यांनी जर वैदिक-ब्राह्मणांच्या व ‘त्या’
अतिबुद्धीमान दलितांच्या संघटनेच्या नादी लागून माळी-उन्माद निर्माण केला तर,
पुढील घटना घडतील- अ) माळी लोकांना
दलित-आरक्षण मिळण्यासाठी संघ-भाजपावाले ताबडतोब माळी जातीतील एखादा कुडमुडा
न्यायधिश शोधून काढतील व त्याच्या अध्यक्षतेखाली मागास आयोग नेमतील. ब) या आयोगात
माळी जातीचेच भटाळलेले सदस्य नेमले जातील. क) याच संघीस्ट माळ्यांच्या बोगस संशोधन
संस्था निर्माण केल्या जातील व त्यांच्याचकडून घरबसल्या बोगस अहवाल तयार करून माळी
लोकांना ‘‘अस्पृश्य’’ ठरविले जाईल. ड) या बोगस अहवालाद्वारे माळ्यांना दलित-आरक्षण
देण्याचा प्रयत्न केला जाईल.
11) ज्या अहवालावर आधारित माळ्यांना ‘‘अस्पृश्य’’ ठरवून
दलित आरक्षण दिले जाईल, तो अहवाल कोर्टाने मागीतला तर सरकारतर्फे नकार देण्यात
येईल. ‘‘अहवाल स्फोटक आहे, दंगली होतील’’, अशी कारणे सांगण्यात येतील. अशा वेळी ‘‘स्फोटक
व दंगलखोर’’ अहवाल बनविणार्या हरामखोरांना फाशीची शिक्षा देण्याची’ मागणी माळी
समाजाने केली पाहिजे. आणी, अशा खोट्या अहवालावर सही करणार्या न्यायधिशाला भर चौकात
नागडा करून चाबकाने फोडून काढण्याची शिक्षा देण्याची मागणी माळी समाजाने केली
पाहिजे.
12) परंतू, माळी समाजावर अजून तरी वैदिक ब्राह्मणांची
चाटूगिरी करण्याची वेळ आलेली नाही, त्यामुळे दलित-आरक्षण मागण्याचा नालायकपणा एकही
माळी करणार नाही. त्याला त्याच्या लायकीपेक्षा व प्रमाणापेक्षा कितीतरी कमी आरक्षण
मिळाले आहे आणी तरीही तो दुसर्यांचे ताट हिसकाविण्याचा मुर्खपणा कधीच करणार
नाही. कारण तो सच्चा फुलेवादी आहे.
13) एखादी जात दलित असेल, ओबीसी असेल, क्षत्रिय असेल
किंवा ब्राह्मण असेल..... त्या जातीला प्रमाणापेक्षा जास्त किंवा लायकीपेक्षा
जास्त आरक्षण मिळाले कि, ती जात उन्मादी बनते, खूनी-दरिंदा बनते. वैदिक
ब्राह्मणांना लायकीपेक्षा व प्रमाणापेक्षा जास्त मिळाले, तर ते अस्पृश्यांच्या
गळ्यात मडके बांधणारी पेशवाई स्थापन करतात. क्षत्रिय असलेल्या सरंजाम
जातींना प्रमाणापेक्षा व लायकीपेक्षा जास्त आरक्षण मिळायला लागताच राज्यात
सरंजामी-पेशवाई स्थापन झाली व दलित-ओबीसी पोरांचे खून पडायला लागलेत.
14) कोणत्याही परिस्थितीत पिडीत तरूणीच्या या
प्रकरणाचा गैरवापर संघ-भाजपाकडून होणार नाही व आपल्या माळी जातीचे तरूण अशा
षडयंत्राला बळी पडणार नाहीत, याची काळजी घ्या. आरक्षणाची ‘खिरापत’ वाटप करीत
फिरणार्या दलित-बौद्ध संघटनांच्या नादी लागू नका. शूद्ध पुरोगामी विचारांच्या
अनेक दलित-बौद्ध संघटना आहेत, त्यांचे मार्गदर्शन घ्या व त्यांच्या सोबत काम करा. वैदिक
ब्राह्मणांनी या पूर्वी असा गैरवापर एका जातीचा केलेला आहे व त्या जातीत जातीय
उन्माद निर्माण करून त्यात पूर्ण महाराष्ट्र होरपळून निघालेला आहे. त्यातून बोध
घेऊन माळी समाज अशा जातीय उन्मादात भर घालणार नाही, अशी मी अपेक्षा करतो.
-2-
अर्थात
माळी समाज तात्यासाहेब महात्मा फुलेंना आदर्श मानत असल्याने ‘शांतता व समता’
त्याच्या रक्तातच आहे. त्याच्या रक्तात ‘‘मारो-काटो-अत्याचार’’ वगैरेचा लवलेशही
नाही व तशी माळी समाजाची परंपराही नाही. मजूर-सालदार-कूळ यांच्या शोषणावर मौजमस्तीचे
सरंजामी चंगळवादी जीवन जगण्यावर माळी समाज थूंकतो. माळीसमाज स्वतः कष्ट करून
आपल्या कुटुंबाचे पालन-पोषण करतो व देशाच्या विकासाला हातभार लावतो. दुसर्यांच्या
आरक्षणाचे ताट माळी समाज कधीच हिसकावून घेणार नाही व तसा षंढ विचार माळ्यांच्या
डोक्यात येणारही नाही. थोडक्यात तो ऐतखाऊ नाही. केवळ माळी समाजच नाही तर
हिंदू-मुस्लीम धर्मातले सगळे बारा-बलुतेदार, भटके-विमुक्त, विश्वकर्मांसह मातंग,
चर्मकार, बौद्ध असे सगळे दलित-आदिवासी-ओबीसी ही 85 टक्के जनता स्व-कष्टाचे खाणारी
आहे व ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य जातीतील ऐतखाऊंना पोसणारी आहे.
खून झाल्यापासून या दोन दिवसात माळी समाजाने
पिडीत मुलीच्या घरी गर्दी केली नाही, ही खूपच अभिमानाची बाब आहे. पिडीत
मुलीच्या मृत्युच्या बदल्यात आमच्या जातीला दलित आरक्षण द्या, ऍट्रॉसिटी ऍक्ट रद्द
करा किंवा मुसलमानांना देशातुन हाकलून द्या, अशी मागणी एकाही माळ्याने केली नाही.
पिडित मुलीच्या घरासमोर माळी जातीची उन्मादी गर्दी नसल्याने मिडियाने प्रसिद्धी
दिलेली नाही. त्यामुळे पवारांपासून फडणवीसांपर्यंतचा एकही हरामखोर नेता तेथे वोट
कॅश करायला कडमडला नाही. माळीजातीतील आमदार-खासदार-मंत्री हे आधीच 'नालायक' म्हणून
प्रसिद्ध आहेत व पवार-फडणवीसांचे पाय चाटत आहेत, याची जाणीव माळी समाजाला आहे.
त्यामुळे कोणीही माळी-ओबीसी त्यांच्याकडून काही अपेक्षा ठेवत नाही.
तरीही अशा परिस्थितीत माळी समाजाने जिल्हाभर
शांततेत मोर्चे काढलेत व त्यात मुसलमान व दलित नेत्यांनाही सामावून घेतले, हा माळी
समाजाचा मोठेपणा आहे. अभिनंदन!
(लेखनः 27जून2020 व प्रकाशन दैनिक लोकमंथन, 28 जून 20)
लेखक-- प्रा. श्रावण देवरे
Mobile – 88 301 27270
Mobile – 88 301 27270
Link for this article- https://shrwandeore.blogspot.com/2020/07/120-bahujannama-jalnamantha-daily.html

No comments:
Post a Comment